Sunday, December 5, 2010

14) शिवरायांचे वंशज राजश्री शाहू महाराज कोल्हापूर यांचे मत...

संदर्भ - आज्ञापत्र क्रमांक - ३८१ (१२/१०/१९२०)
            (मुलकी खाते ठराव करा. ४९०)
            "शाहू छत्रपती निवडक आदेश" - भाग २ रा  प्रकाशक - पुराभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन.

 माझे मत - छत्रपती शाहू महाराजांच्या वरील आज्ञापात्रातून स्पष्ट पणे राजश्रींनाही त्या काळी रामदास आणि दादोजींचे गुरु पद म्हणजे ब्राह्मणांची क्लृप्ती वाटत होती असे दिसून येते.. त्या बरोबरच त्यांनी रामदास आणि दादोजी ह्यांच्या गुरुपदाचे संदर्भ मिळत नाहीत असेही वर्णिलेले आहे..व त्या बरोबरच शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे मौनी महाराज हे होते असेही नमूद केलेले आहे...मौनी महाराजांच्या संदर्भातील अनेक पुरावे  ९१ कलमी बखरीत मिळतात..परंतु विषय हा रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज ह्यांच्या संबंधा वरचा आहे.. त्या मूळे विषयांतर नको ह्या हेतूने मौनी महाराजांबद्दल सविस्तर माहिती इथे देत नाही..
  राजश्री शाहू महाराजांचे कार्य हे सर्व श्रुतच आहे.. त्या काळात ब्राह्मण समाजातील काही मंडळींची वागणूक तशी असावी म्हणून महाराजांनी ब्राह्मण समाजाचे वर्चस्व जुगारून देण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे "क्षात्र जगत गुरु पिठाची" स्थापना.. ती देखील शिवरायांचे खरे गुरु मौनी महाराज ह्यांच्या मठाच्या जागीच (जो मठ स्वतः शिवरायांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी व राजाराम महाराजांनी बांधून घेतला = शिवरायांच्या काळात सुरवात- संभाजी महाराजांच्या काळात बांधकाम चालूच राहिले, आणि राजाराम महाराजांच्या काळात पूर्णत्वास आले..) स्थापना केली त्या बद्दलचे वरील आदेश पत्र आहे...
    शाहू महाराजांनी तत्कालीन एक प्रयत्न केला होता..रामदास आणि दादोजी ह्यांना बळजबरी पणे शिवरायांच्या गुरु पदावर बसवण्याचे उपद्रव हे त्या काळीही खूप झाले असावेत.. म्हणूनच शाहू महाराजांनी वरील आज्ञा पत्रात तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.. की रामदास आणि दादोजी यांचे गुरु पद हि ब्राह्मनांचीच एक क्लृप्ती आहे (छल कपट / लबाडपणा आहे) त्यावर उपाय म्हणून महाराजांनी मौनी महाराजांचे कार्य जे विस्मरनास गेले आहे ते वरती आणण्याचा प्रयत्न केला...
                 आजही तोच प्रकार ह्या न त्या स्वरुपात चालूच आहे.. खुद्द शाहू महाराजांनी एवढे प्रयत्न करूनही आज रामदास आणि दादोजी यांचे खोटे गुरुपद का मिरवले जाते.. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधले तर.. कुठे तरी आपल्याच लोकांचे अज्ञान अथवा अजागृकता असे उत्तर मिळेल...आपली माणसे हि इतिहास लिहिण्या आणि वाचण्या पेक्षा इतिहास घडवन्यातच जास्त धन्यता मानतात.. पण त्या मूळे इतिहास लिखाणात आणि वाचनात झालेल्या दुर्लक्षतेचा फायदा काही रामदास आणि दादोजी भक्तांनी घेऊन स्वतःचे साधून घेतलेले आहे...अजून किती दिवस आपण त्या रामदाशी आणि दादोजींच्या भक्तांच्या लबाडीला बळी पडणार आहोत...बहुसंख्य जनतेने रामदासी आणि दादोजींच्या लबाड भक्तांवर विश्वास नाही ठेवला तर हे असले प्रश्न निर्माणच होणार नाही...त्या साठी मग इतर कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवा असेही नाही.. जागरूकतेने  आणि डोळ्यांवर कोणत्याही एका प्रकारचा चष्मा न घालता इतिहासाचे वाचन करा...आपल्या लोकांवर विश्वास ठेवायला शिका...

1 comment:

Anonymous said...

Shambhu Raje baddal thod likhan kele tar khare Shanbhu Raje lokana kaltil.

Krupaya Shambhu Rajen var ekhada detail blog lihava hi apeksha aahe.