Thursday, August 19, 2010

रामदासांची शिकवण आणि महाराजांची वर्तणूक...

६) रामदास महाराजांचे अध्यात्मिक दृष्ट्याही गुरु न्हवते. कारण रामदासांचे विचार हे ब्राह्मणी वर्चस्व भावनेतून ब्राह्मण धर्म  रक्षण करणारे होते. उदा. दाखल त्यांचे काही श्लोक घेता येतील  
अंतर तो एक खरे, परी संगती घेऊ नये महारे|
 पंडित आणि चाटी पोरे | एक कैशी ||
 
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका ---- वाई परगण्यातील नागनवाडी गावाची पाटीलकी छ. शिवरायांनी नागनाक महाराला दिली. अनेक महार , मांग किल्लेदार होते. तर रामोशी हेर खात्यात होते...)  
गुरु तो सकालांशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन,
तरी तयासीच शरण | अनन्यभाव असावे ||
 
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका -- संत तुकाराम महाराज, याकूत बाबा अशा ब्राह्मणेतर संतांना हि शिवराय मानत...) 
असो ब्राह्मण, सुरवर वंदिती| तेथे मानव बापुडे किती|
जरी ब्राह्मण मूढमती | तरी तो जगदवंद्य ||
 
अर्थ -- मूढमती म्हणजे मूर्ख. ब्रह्मण मूर्ख असला तरी तो जगाला वंदनीय असतो, असे रामदास म्हणतात. 
देवा ब्राह्मणा राज्य करी | तो एक मूर्ख || 
रामदासांनी सांगितलेले मूर्खाचे एक लक्षण.
महाराजांचे विरोधी तत्व --- छ. शिवरायांनी ब्राह्मणांवर फक्त राज्यच केले नाही तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शासनही केले. अशा छ. शिवरायांना रामदासांचे शिष्य मानाने योग्य वाटत नाही...कारण दोघांच्या विचारात बराच विरोधाभास आढळतो.... 
संदर्भ ---- शिवचरित्र मिथक आणि वास्तव. - ---श्यामसुंदर मिरजकर.

No comments: